उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाच्या मनात वरील प्रश्न डोकावत असतो. व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल लागू शकते, शिवाय त्या व्यवसायाबद्दल अनुभव / माहिती असणे जरूरीचे असू शकते. व्यवसाय म्हणलं की यश मिळेल का ? याबाबत शंका / कुशंका येऊ शकतात. अपयश आल्यास आपले आप्तस्वकीय आपल्याला काय म्हणतील त्याबद्दलही मनात विचार येऊ शकतात. ह्या सगळ्या मनातील विचारांचा परिणाम आपल्या पुढील कृतीवर होतोच.
खरं तर आपण आपल्या लहानपणापासून अनेक उद्योग खूप जवळून पाहात असतो. अनेक उद्योग हे कमी भांडवलात होऊ शकतात हेही समजलेले असते. भाजी /फळे, खाद्यपदार्थांची विक्री , स्टेशनरीचे दुकान, गोळ्या बिस्किटांचे दुकान, विद्युत उपकरणांची दुरुस्ती, फुलांची / हाराची विक्री, फुलगुच्छ बनवून विक्री, केशकर्तनालय, शिवणकाम, ऑटोरिक्षा / टॅक्सी चालवणे अशा उद्योगांपासून ते छोट्या स्वरुपाचा कारखाना उभा करण्यापर्यंत अनेक उद्योग आपण पाहिलेले असतात. त्या उद्योजकांशी आपण बोलले देखील असतो. त्यातील काही चांगल्या माहितीचे झालेले असतात.
आपण विचार केला पाहिजे की त्यातील बहुतांशी जण आपल्या सारखेच असतात. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी / शिक्षण आपल्यासारखीच असते. म्हणजे ते जे काही करत आहेत, ते आपल्यालाही जमायला पाहिजे. त्यांना जे यश मिळाले आहे त्यांच्या व्यवसायात, तसे मलाही मिळायला हरकत नाहीये. त्यांच्या व्यवसायाच्या बळावर ते त्यांचे घर व्यवस्थित चालवत आहेत, तसे मलाही चालवता आले पाहिजे. अर्थात यश मिळवण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे उमेदवारी / कष्ट केले, यशासाठी धडपड केली,कसोटीच्या काळात संयम बाळगला, त्याप्रमाणे मी सुद्धा ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत अन त्यासाठी माझी तयारी आहे. अशा प्रकारे आपण आपल्या मनाला आश्वस्त केल्यावर पुढील विचार करायला सुरुवात केली पाहिजे. कोणताही उद्योग करण्याचा विचार करताना प्रथम आपल्या ग्राहकाचा विचार महत्वाचा. आपण आपला हा उद्योग ज्या भागात करायचा त्या भागातील संभाव्य ग्राहकांची गरज काय आहे आणि आपण ती कशा प्रकारे भागवू शकतो ?
ग्राहक आपल्याकड़े येण्यासाठी आपण काय करू शकतो ? ग्राहकांची गरज आता कोण भागवत आहे आणि त्या मंडळींपेक्षा, दर्जा , किंमत, उपलब्धता ह्यापैकी कोणती गोष्ट मी ग्राहकाला जास्तीची देऊ शकतो ? चांगला दर्जा असला तर किंमत जास्त असूनही ग्राहक त्याला पसंती देऊ शकतो. व्यवसायाच्या जागेच्या अवती भवती आपले ग्राहक आहेत का ? ते संख्येने किती आहेत त्याचाही अंदाज महत्वाचा. बाजारपेठेतील जागा असल्यास गिऱ्हाईक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असेल. त्या ठिकाणी गिऱ्हाईकांची संपूर्ण सोय ( त्वरित पुरवठा / विक्री करण्याची व्यवस्था आणि मालाची उपलब्धता ) हा महत्वाचा भाग असेल.
ग्रामीण भागातून शेतीमाल / फळे आणवून घेवून वेगवेगळ्या कंपन्यांच्या किंवा सहकारी गृहसंस्थेच्या आवारात विक्री करणे, शेतमालावर प्रक्रिया करुन ( निवडणे, स्वच्छता करणे, चिरणे, सोलणे अशा सारख्या प्रक्रिया ) आधी आर्डर घेऊन त्याप्रमाणे घरोघरी पुरवठा करणे, फणस, डाळिंब, पपई सारख्या फळांवर काम करून खाण्यास सुलभ करुन विकणे, अश्यासारख्या व्यवसायाला बराच वाव आहे. ह्या गोष्टींचा जम बसवायला वेळ लागतो पण त्यानंतर पुढील प्रवास सुखकर होतो. शहराच्या उपनगरात अश्या प्रकारच्या व्यवसायाला चांगलाच वाव आहे.
खरं तर आपण आपल्या लहानपणापासून अनेक उद्योग खूप जवळून पाहात असतो. अनेक उद्योग हे कमी भांडवलात होऊ शकतात हेही समजलेले असते. भाजी /फळे, खाद्यपदार्थांची विक्री , स्टेशनरीचे दुकान, गोळ्या बिस्किटांचे दुकान, विद्युत उपकरणांची दुरुस्ती, फुलांची / हाराची विक्री, फुलगुच्छ बनवून विक्री, केशकर्तनालय, शिवणकाम, ऑटोरिक्षा / टॅक्सी चालवणे अशा उद्योगांपासून ते छोट्या स्वरुपाचा कारखाना उभा करण्यापर्यंत अनेक उद्योग आपण पाहिलेले असतात. त्या उद्योजकांशी आपण बोलले देखील असतो. त्यातील काही चांगल्या माहितीचे झालेले असतात.
आपण विचार केला पाहिजे की त्यातील बहुतांशी जण आपल्या सारखेच असतात. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी / शिक्षण आपल्यासारखीच असते. म्हणजे ते जे काही करत आहेत, ते आपल्यालाही जमायला पाहिजे. त्यांना जे यश मिळाले आहे त्यांच्या व्यवसायात, तसे मलाही मिळायला हरकत नाहीये. त्यांच्या व्यवसायाच्या बळावर ते त्यांचे घर व्यवस्थित चालवत आहेत, तसे मलाही चालवता आले पाहिजे. अर्थात यश मिळवण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे उमेदवारी / कष्ट केले, यशासाठी धडपड केली,कसोटीच्या काळात संयम बाळगला, त्याप्रमाणे मी सुद्धा ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत अन त्यासाठी माझी तयारी आहे. अशा प्रकारे आपण आपल्या मनाला आश्वस्त केल्यावर पुढील विचार करायला सुरुवात केली पाहिजे. कोणताही उद्योग करण्याचा विचार करताना प्रथम आपल्या ग्राहकाचा विचार महत्वाचा. आपण आपला हा उद्योग ज्या भागात करायचा त्या भागातील संभाव्य ग्राहकांची गरज काय आहे आणि आपण ती कशा प्रकारे भागवू शकतो ?
ग्राहक आपल्याकड़े येण्यासाठी आपण काय करू शकतो ? ग्राहकांची गरज आता कोण भागवत आहे आणि त्या मंडळींपेक्षा, दर्जा , किंमत, उपलब्धता ह्यापैकी कोणती गोष्ट मी ग्राहकाला जास्तीची देऊ शकतो ? चांगला दर्जा असला तर किंमत जास्त असूनही ग्राहक त्याला पसंती देऊ शकतो. व्यवसायाच्या जागेच्या अवती भवती आपले ग्राहक आहेत का ? ते संख्येने किती आहेत त्याचाही अंदाज महत्वाचा. बाजारपेठेतील जागा असल्यास गिऱ्हाईक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असेल. त्या ठिकाणी गिऱ्हाईकांची संपूर्ण सोय ( त्वरित पुरवठा / विक्री करण्याची व्यवस्था आणि मालाची उपलब्धता ) हा महत्वाचा भाग असेल.
ग्रामीण भागातून शेतीमाल / फळे आणवून घेवून वेगवेगळ्या कंपन्यांच्या किंवा सहकारी गृहसंस्थेच्या आवारात विक्री करणे, शेतमालावर प्रक्रिया करुन ( निवडणे, स्वच्छता करणे, चिरणे, सोलणे अशा सारख्या प्रक्रिया ) आधी आर्डर घेऊन त्याप्रमाणे घरोघरी पुरवठा करणे, फणस, डाळिंब, पपई सारख्या फळांवर काम करून खाण्यास सुलभ करुन विकणे, अश्यासारख्या व्यवसायाला बराच वाव आहे. ह्या गोष्टींचा जम बसवायला वेळ लागतो पण त्यानंतर पुढील प्रवास सुखकर होतो. शहराच्या उपनगरात अश्या प्रकारच्या व्यवसायाला चांगलाच वाव आहे.
----
लेखक, उद्योजकांना संपूर्ण मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या देआसरा फाऊंडेशन चे संचालक असून यशस्वी उद्योजक ह्या मराठी मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.
एक नंबर साहेब
ReplyDelete